"ही आठ मुलं, म्हणजे नियतीनं आईला घालून ठेवलेली आठ कोडी. "
या एका वाक्यात "करुणाष्टक" चं सगळं सार सामावलं आहे.
खेड्यात वाढलेली, गरीब ब्राह्मणाची मुलगी, तिचा शांत, गरीब स्वभावाचा पती, आणि एकामागून एक अवघड अवघड कोडी घालत जाणारी नियती.
ही सगळी कोडी सोडवण्यात त्या माऊलीचं आयुष्यच करुणाष्टक बनून गेलं.
'आधुनिक वाल्मिकी' म्हणून प्रसिद्ध झालेले गीतरामायणकार कविवर्य ग. दि. माडगूळकर , आणि लेखक, प्राणिप्रेमी, जंगल वाचक, रेखाचित्रकार, चित्रपट कथालेखक श्री. व्यंकटेश माडगूळकर , ही त्या माऊलीने महाराष्ट्राला भेट दिलेली दोन रत्ने.
लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी आपल्या आईची जीवनगाथा , तिचे कष्टमय आयुष्य, मुलांच्या प्रगतिसाठी, आणि घरादाराच्या उत्कर्षासाठी तिची चाललेली तडफड, याबरोबरच शिकलेली नसूनही तिच्यात असलेला व्यवहारीपणा , आणि नवर्याच्या शांत, थंड स्वभावाचा परिणाम म्हणून की काय, तिच्यात आलेला तापटपणा, फटकळपणा, हे सारे "करुणाष्टक" या पुस्तकात चित्रित केले आहे.
समर्थ रामदासांनी प्रभूरामचंद्राला उद्देशून रचलेले, अतिशय कळवळून त्याची प्रार्थना करणारे आठ श्लोक हे करुणाष्टके म्हणून ओळखले जातात. अनुदिन अनुतापे -- अशी सुरुवात असलेले हे श्लोक आजही अनेक घरात म्हटले जातात. त्यातील जो भाव आहे, तो या सर्व कथनात भरून राहिला आहे.
माणदेशी माणसं, बनगरवाडी, सत्तांतर, वावटळ, अशा अनेक पुस्तकांतून आपल्याला त्यांच्या सहज, सोप्या, आणि मनाला थेट भिडणार्या शैलीची ओळख झाली आहे.
या पुस्तकात आपल्या आईबद्दल लिहिताना सर्व औपचारिकता गळून पडली आहे. एखाद्या देवळाच्या कट्ट्यावर, किंवा गावातल्या पारावर बसून आपल्याशी ते मनातल्या गोष्टी बोलत असावेत, इतकी सहजता या लेखनात आहे.
पुस्तक शांतपणे, त्याच गांभिर्याने वाचले, तर वेळोवेळी आईच्या आठवणीने भरून आलेले त्यांचे मनही आपल्याला समजू शकते.
आईच्या बरोबरीने या सर्वच भावंडांचे कष्टमय आयुष्य आपल्यासमोर येते. १९४७ च्या आसपासचा काळ डोळ्यासमोर उभा रहातो.
आपल्या मोठ्या बंधूंबद्दलही अतिशय संयमाने, ओघाने आले, तसे लिहिले आहे.
वडिलांबरोबर काढलेल्या दिवसांचेही खूप लोभस वर्णन आहे.
काही काही वाक्ये कायमची डोक्यात घुसून रहातात. जसे- -
"आणि स्वर्गातून देवदर्शन व्हावे, तसे विहिरीच्या काठावरुन डोकावणारे दादा मला विहिरीच्या तळातून दिसले. "
तसंच- -
"यानंतरही खाईत पडण्याचा उद्योग मी बर्याच वेळा केला, पण तेव्हा मला बाहेर काढायला दादा नव्हते."
या पुस्तकाचे मुखपृष्ठ, आणि आतली सर्व रेखाचित्रे त्यांची स्वतःची आहेत.
थोडक्यात म्हणजे, प्रत्येक मराठी पुस्तकप्रेमीच्या संग्रहात असायलाच हवे, असे हे पुस्तक आहे.
या एका वाक्यात "करुणाष्टक" चं सगळं सार सामावलं आहे.
खेड्यात वाढलेली, गरीब ब्राह्मणाची मुलगी, तिचा शांत, गरीब स्वभावाचा पती, आणि एकामागून एक अवघड अवघड कोडी घालत जाणारी नियती.
ही सगळी कोडी सोडवण्यात त्या माऊलीचं आयुष्यच करुणाष्टक बनून गेलं.
'आधुनिक वाल्मिकी' म्हणून प्रसिद्ध झालेले गीतरामायणकार कविवर्य ग. दि. माडगूळकर , आणि लेखक, प्राणिप्रेमी, जंगल वाचक, रेखाचित्रकार, चित्रपट कथालेखक श्री. व्यंकटेश माडगूळकर , ही त्या माऊलीने महाराष्ट्राला भेट दिलेली दोन रत्ने.
लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी आपल्या आईची जीवनगाथा , तिचे कष्टमय आयुष्य, मुलांच्या प्रगतिसाठी, आणि घरादाराच्या उत्कर्षासाठी तिची चाललेली तडफड, याबरोबरच शिकलेली नसूनही तिच्यात असलेला व्यवहारीपणा , आणि नवर्याच्या शांत, थंड स्वभावाचा परिणाम म्हणून की काय, तिच्यात आलेला तापटपणा, फटकळपणा, हे सारे "करुणाष्टक" या पुस्तकात चित्रित केले आहे.
समर्थ रामदासांनी प्रभूरामचंद्राला उद्देशून रचलेले, अतिशय कळवळून त्याची प्रार्थना करणारे आठ श्लोक हे करुणाष्टके म्हणून ओळखले जातात. अनुदिन अनुतापे -- अशी सुरुवात असलेले हे श्लोक आजही अनेक घरात म्हटले जातात. त्यातील जो भाव आहे, तो या सर्व कथनात भरून राहिला आहे.
माणदेशी माणसं, बनगरवाडी, सत्तांतर, वावटळ, अशा अनेक पुस्तकांतून आपल्याला त्यांच्या सहज, सोप्या, आणि मनाला थेट भिडणार्या शैलीची ओळख झाली आहे.
या पुस्तकात आपल्या आईबद्दल लिहिताना सर्व औपचारिकता गळून पडली आहे. एखाद्या देवळाच्या कट्ट्यावर, किंवा गावातल्या पारावर बसून आपल्याशी ते मनातल्या गोष्टी बोलत असावेत, इतकी सहजता या लेखनात आहे.
पुस्तक शांतपणे, त्याच गांभिर्याने वाचले, तर वेळोवेळी आईच्या आठवणीने भरून आलेले त्यांचे मनही आपल्याला समजू शकते.
आईच्या बरोबरीने या सर्वच भावंडांचे कष्टमय आयुष्य आपल्यासमोर येते. १९४७ च्या आसपासचा काळ डोळ्यासमोर उभा रहातो.
आपल्या मोठ्या बंधूंबद्दलही अतिशय संयमाने, ओघाने आले, तसे लिहिले आहे.
वडिलांबरोबर काढलेल्या दिवसांचेही खूप लोभस वर्णन आहे.
काही काही वाक्ये कायमची डोक्यात घुसून रहातात. जसे- -
"आणि स्वर्गातून देवदर्शन व्हावे, तसे विहिरीच्या काठावरुन डोकावणारे दादा मला विहिरीच्या तळातून दिसले. "
तसंच- -
"यानंतरही खाईत पडण्याचा उद्योग मी बर्याच वेळा केला, पण तेव्हा मला बाहेर काढायला दादा नव्हते."
या पुस्तकाचे मुखपृष्ठ, आणि आतली सर्व रेखाचित्रे त्यांची स्वतःची आहेत.
थोडक्यात म्हणजे, प्रत्येक मराठी पुस्तकप्रेमीच्या संग्रहात असायलाच हवे, असे हे पुस्तक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा