२०१६ या वर्षाचा शेवट, आणि २०१७ची सुरुवात.
आदर्श, विकास आणि श्रीकृष्ण ही तीन विशीच्या आसपासची मुले आपल्याच आदिवासी बांधवांच्या जीवनाबद्दल उत्सुकता मनात धरुन सायकलवरुन प्रवास सुरू करतात. आपलेच लोक आपल्याच विरुद्ध बंदुका रोखत नक्षलवादी का होतात, हा त्यांना पडलेला आणखी एक प्रश्न. तो सोडवण्यासाठी भामरागडच्या पलिकडे, छत्तिसगढच्या प्रत्यक्ष नक्षली भागात, सगळ्यांच्या सूचना झुगारून ते सायकली दामटतात. मग बातमी येते, की तीन मुलांना नक्षलवाद्यांनी पकडले.
चार दिवसांनंतर त्यांची नाट्यमय रितीने सुटका केल्याच्या पण बातम्या झळकतात.
हे नक्षल्यांच्या कैदेतले चार दिवस, आल्यानंतर ते शब्दबद्ध करतात.
साधना प्रकाशन " तीन मुलांचे चार दिवस" या नावाने याला पुस्तकाचे रूप देते,
एकच अनुभव, तिघांच्या नजरेतून.
असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.
या वयातल्या शहरी मुलांना सुटीत असे काही करावेसे वाटणे, हीच खूप मोठी गोष्ट आहे.
तिघेहीजण मुळात लेखक नसल्याने, आपल्या अकृत्रिम शैलीत, डायरी लिहावी तसे हे लेखन त्यांनी केले आहे. आणि हेच या पुस्तकाचे बलस्थान आहे.
या सफरीमधली अनेक छायाचित्रे पुस्तकात समाविष्ट केली आहेत.
मुखपृष्ठावरील तिघांचे बोलके चेहरेच खूप काही सांगून जातात. त्यांची प्रगल्भता, जिद्द, उत्साह, आणि सकारात्मकता हे सगळे चेहर्यावर दिसते.
आजच्या तरुणाईविषयी जे लोक निराश आहेत, त्यांच्यासाठी आशेचा किरण आणण्याचे काम हे पुस्तक नक्की करेल.
संपादक विनोद शिरसाठ यांनी प्रस्तावनेत या पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास सांगून रोचकता आणखी वाढवली आहे.
वृत्तपत्रांतील कात्रणे, मुलांनी बनवलेल्या नकाशाचे छायाचित्र, अशा गोष्टी पण यात समाविष्ट केल्या आहेत.
त्यामुळे आपण एक सत्यघटना वाचत आहोत, याचा क्षणभरही विसर पडत नाही.
थोडक्यात म्हणजे ज्यांनी अजून वाचले नाही, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावे.
(रसग्रहण- रमा खटावकर.)
आदर्श, विकास आणि श्रीकृष्ण ही तीन विशीच्या आसपासची मुले आपल्याच आदिवासी बांधवांच्या जीवनाबद्दल उत्सुकता मनात धरुन सायकलवरुन प्रवास सुरू करतात. आपलेच लोक आपल्याच विरुद्ध बंदुका रोखत नक्षलवादी का होतात, हा त्यांना पडलेला आणखी एक प्रश्न. तो सोडवण्यासाठी भामरागडच्या पलिकडे, छत्तिसगढच्या प्रत्यक्ष नक्षली भागात, सगळ्यांच्या सूचना झुगारून ते सायकली दामटतात. मग बातमी येते, की तीन मुलांना नक्षलवाद्यांनी पकडले.
चार दिवसांनंतर त्यांची नाट्यमय रितीने सुटका केल्याच्या पण बातम्या झळकतात.
हे नक्षल्यांच्या कैदेतले चार दिवस, आल्यानंतर ते शब्दबद्ध करतात.
साधना प्रकाशन " तीन मुलांचे चार दिवस" या नावाने याला पुस्तकाचे रूप देते,
एकच अनुभव, तिघांच्या नजरेतून.
असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.
या वयातल्या शहरी मुलांना सुटीत असे काही करावेसे वाटणे, हीच खूप मोठी गोष्ट आहे.
तिघेहीजण मुळात लेखक नसल्याने, आपल्या अकृत्रिम शैलीत, डायरी लिहावी तसे हे लेखन त्यांनी केले आहे. आणि हेच या पुस्तकाचे बलस्थान आहे.
या सफरीमधली अनेक छायाचित्रे पुस्तकात समाविष्ट केली आहेत.
मुखपृष्ठावरील तिघांचे बोलके चेहरेच खूप काही सांगून जातात. त्यांची प्रगल्भता, जिद्द, उत्साह, आणि सकारात्मकता हे सगळे चेहर्यावर दिसते.
आजच्या तरुणाईविषयी जे लोक निराश आहेत, त्यांच्यासाठी आशेचा किरण आणण्याचे काम हे पुस्तक नक्की करेल.
संपादक विनोद शिरसाठ यांनी प्रस्तावनेत या पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास सांगून रोचकता आणखी वाढवली आहे.
वृत्तपत्रांतील कात्रणे, मुलांनी बनवलेल्या नकाशाचे छायाचित्र, अशा गोष्टी पण यात समाविष्ट केल्या आहेत.
त्यामुळे आपण एक सत्यघटना वाचत आहोत, याचा क्षणभरही विसर पडत नाही.
थोडक्यात म्हणजे ज्यांनी अजून वाचले नाही, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावे.
(रसग्रहण- रमा खटावकर.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा